मोरोपंत : ‘विबुधप्रिया, सवया रामायण’

बुद्धिमंतांना प्रिय असं विबुधप्रिया वृत्त.  यातही मोरोपंतांनी त्यांच्या भाषाप्रभुत्वातून रामकथा खुलवली आहे. मोरोपंत विबुधप्रिया वृत्ताला हरिनर्तन छंद म्हणतात. (गालगालल गालगालल गालगा)  गेयता असलेल्या या वृत्तातील प्रत्येक ओळीत एकेक घटना गुंफत मोरोपंतांनी  कथेला वेग दिला आहे. २६२/४/  शंभुच्या धनुचे, पळांत चि ओढितां   तुकडे करी जानकी, पणसिद्धि पाहुनि, हर्षुनि, प्रभुतें वरी,  दे  तिघांसि सुता तिघी, जनकासि कीर्ति मिळे बरी  या दोन वाक्यांत रामाचा विवाहही होऊन जातो. … Continue reading मोरोपंत : ‘विबुधप्रिया, सवया रामायण’

मैत्र जीवाचें

उत्क्रांतीच्या ओघाकाठी वचन दिले उभयतां युगायुगांचे अतूट व्रत, हो दिग्विजयीं सांगता रानघऱ्यांचा गृहप्रवेश  कोंबडा आरवला. भैरू उठला. तोंड धुऊन त्याने न्याहारी केली. पारूने त्याला शिदोरी बांधून दिली. तोवर भैरूने बैलांना वैरणपाणी दिलं आणि त्यांना घेऊन तो शेताकडे निघाला. पारूने कपिलेला आणि शालू शेळीला चारा दिला. वासराला आणि कोकराला प्यायला सोडलं; मग दूध काढलं. मोत्या कुत्र्याला भाकरी दिली; मनीला दूध दिलं; कोंबड्यांना दाणे टाकले. गायी, बैल, शेळ्या, कुत्री, … Continue reading मैत्र जीवाचें

खवय्या : गुऱ्हाळ (भाग १)

या अंकापासून सागर वामन दामले यांच्यासोबत एक खाद्यसफर  सुरु करत आहोत.  लेखक सागर वामन दामले हे शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. २००५ साली, पदव्युत्तर परीक्षा झाल्यावर नोकरीच्या निमित्ताने सांगलीहून ठाण्यात आले आणि ठाण्यातच रमले. एका नावाजलेल्या मल्टिनॅशनल कंपनीत जवळपास १३वर्षे  शॉप फ्लोअर इंजिनीअरपासून प्रॉडक्शन मॅनेजर असा प्रवास केला. नंतर स्वतःची स्वयंपाकाची आवड आणि ज्ञान जोपासण्यासाठी, तसेच विस्मृतीत गेलेले मराठी पदार्थ पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी ‘मुक्तछंद किचन’ नावाचे … Continue reading खवय्या : गुऱ्हाळ (भाग १)

ज्ञानपीठ पुरस्कार लेख क्र. ८

वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’: मराठी साहित्यातील ध्रुवतारा     १९७४ मध्ये वि. स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मराठी मानकरी ठरले. त्यानंतर एक तप उलटून गेल्यावर १९८७ साठी कुसुमाग्रजांना हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा समीक्षक आणि सर्वसाधारण वाचक, सर्वांनाच या निर्णयाचा आनंद झाला. विशेष म्हणजे खांडेकरांना हा पुरस्कार मिळाला त्या वेळी कुसुमाग्रज या सन्मानास पात्र असल्याचे उद्गार त्यांनी काढले होते. २७ फेब्रुवारी १९१२ रोजी गजानन … Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार लेख क्र. ८

झुकझुक आगीनगाडी : लेख क्र. १९

पाहुणचार    मध्यरेल्वेच्या सोलापूर मंडळामध्ये अनेक धार्मिक व इतर पर्यटन स्थळे आहेत. उदा. शिर्डीचे साईबाबा, पंढरपूरचे श्रीविठ्ठल मंदिर, नळदुर्ग किल्ला व तेथील ‘नर-मादी’ धबधबा, तुळजापूर, गाणगापूर, भिगवणजवळील फ्लेमिंगो अभयारण्य, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, दत्त चौकातील चर्च, तसेच कलबुर्गी (गुलबर्गा) येथील मशीद आणि मंदिरे. ज्या वेळी एखाद्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी तपासणीसाठी येतात, त्या वेळी त्यांचे देवदर्शन आणि त्यातही फुकटचे व्ही.आय.पी. दर्शन व त्यांची सरबराई करणे म्हणजे सोलापूरमधील … Continue reading झुकझुक आगीनगाडी : लेख क्र. १९

चित्रओळी : लिहिण्याचे सामे असावे

भारतातील हस्तलिखित पोथ्यांचे विश्व इथल्या कलाविश्वासारखेच अथांग आहे. याच्या प्रारंभाबद्दल किंवा अवाक्याबद्दल आजवर बरेच संशोधन होत आले असले तरीसुद्धा या संबंधी बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत किंवा त्यांची उत्तरे नेमकेपणाने देता येत नाहीत. भारतातल्या उपलब्ध असलेल्या हस्तलिखित पोथ्यांची संख्या सुमारे पन्नास लाखांच्या घरात आहे, यावरूनही या क्षेत्राच्या आवाक्याचा काहीसा अंदाज येऊ शकतो. इंग्रजीमध्ये पोथी लिहणाऱ्याला ‘स्क्राइब’ असे नाव आहे. याची व्युत्पत्ती पाहता, कोरणारा किंवा खरवडणारा असा … Continue reading चित्रओळी : लिहिण्याचे सामे असावे

यास्मिन शेख : चिरतरुण भाषायोगिनी

  ‘मूर्तिमंत मराठीप्रेम’ या दोन शब्दांत ज्यांचे अवघे जीवन सामावलेले होते त्या यास्मिन शेख यांनी  सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता वयाच्या एकशेएकाव्या वर्षी पुण्यात शेवटचा श्वास घेतला. वयाचा विचार करता अनपेक्षित नसले तरी त्यांचे निधन हे जिवाला चटका लावणारे होते. त्याच दिवशी दुपारी तीन वाजता बाणेर येथील विद्युतदाहिनीत जेव्हा त्यांचा देह शेवटचा दृष्टीआड झाला तेव्हा एक विलक्षण रितेपण मनात दाटून आले. कसेबसे स्वतःला आवरत, … Continue reading यास्मिन शेख : चिरतरुण भाषायोगिनी

चीन आणि रवींद्रनाथ : एका अनुबंधाचा शोध

  डावीकडून उजवीकडे :  विनोद शिरसाठ, सतीश बागल, भानू काळे, नीती बडवे व सानिया कर्णिक.  रविवार, १९ जुलै २०२६. पुण्यातील एस एम जोशी सोशालिस्ट फौंडेशनचे सभागृह. संध्याकाळी सहाची वेळ. बरीच गर्दी जमली होती. निमित्त होते ‘चीन भेटीतील भाषणे’ या सानिया कर्णिक यांनी अनुवादिद केलेल्या आणि साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन. मराठी वाचकांची संख्या घटत चालली आहे असे अलीकडे नेहमीच म्हटले जाते पण तसे जरी असले … Continue reading चीन आणि रवींद्रनाथ : एका अनुबंधाचा शोध

ज्ञानपीठ पुरस्कार लेख ७

महादेवी वर्मा : विसाव्या शतकातील सर्वाधिक प्रभावशाली हिंदी लेखिका १९८१ मध्ये अमृता प्रीतम यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारानंतर पुढल्याच वर्षी तो सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिका महादेवी वर्मा यांना मिळावा ही गोष्ट दोन कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरते : एक म्हणजे स्त्रीलेखिकांना हा पुरस्कार लागोपाठ दोन वर्षी मिळणे आणि दुसरे म्हणजे  अमृता प्रीतम यांनीदेखील हिंदीमध्ये विपुल प्रमाणात लिहिले आहे.  हिंदी भाषा : इतिहास, वर्तमान, साहित्य आणि साहित्यिक  महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून … Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार लेख ७

चित्रओळी : चित्रमय पोथ्या भाग २

महाराष्ट्रातल्या चित्रमय पोथ्यांबाबत पहिल्या भागात आपण जाणून घेतले. नागपूर भागातल्या पोथ्यांचे थोडक्यात रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला. नागपूर भागातल्या या परंपरेतील अत्युच्च शिखर म्हणता येईल असे काम म्हणजे, ज्ञानेश्वरीची ‘नारायण’ या सुलेखनकाराने बनवलेली हस्तलिखित चित्रमय प्रत. ही प्रत बऱ्याच अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रतीचा आकार १४” x १०” असा आहे. पोथ्यांच्या रूढ आकारापेक्षा हा खूप मोठा आकार आहे. ही पोथी सध्या व्हर्जिनिया संग्रहालय, रिचमोंड, अमेरिका इथे … Continue reading चित्रओळी : चित्रमय पोथ्या भाग २