चित्रओळी (१) : श्रीगणेशा

‘वस्त्रगाथाकार’ विनय नारकर यांच्या व्यासंगाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ते करत असलेला मराठा चित्रशैलीचा अभ्यास. याबाबत ते अंतर्नादमध्ये क्रमशः लिहिणार आहेत.या लेखमालेतील निवडक चित्रे ही अंतर्नादच्या काही आगामी अंकांची मुखपृष्ठे असतील. संपादक ‘वस्त्रगाथा’ हे पुस्तक २०२४ मध्ये प्रकाशित झाले. महाराष्ट्राची वस्त्र परंपरा आणि माझा संशोधन-प्रवास या विषयावरचे हे पुस्तक आहे. वस्त्रगाथाच्या रचना प्रक्रियेत सगळ्यात जास्त ऊहापोह झाला तो चित्रांबाबतच. पुस्तकात चित्रं कशाप्रकारची असावीत, याबाबत स्पष्टता … Continue reading चित्रओळी (१) : श्रीगणेशा

महाराष्ट्र भूषण : आशाताई भोसले यांची आठवण

🎼🎵🎼🎷🎼🎺🎼🎸🎼🪕🎺🎹🎸🎻               मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. चोहोबाजूंनी प्रचंड विस्तारलेले शहर, प्रचंड मोठी धावपळ, गजबज आणि सतत  धावायला लावणारे शहर आहे. या शहरात कितीतरी प्रकारची नानाविध क्षेत्रांतील, वेगवेगळ्या स्वभावांची,  जातीधर्मांची, सर्व पंथांची जगातील व राज्यांतील सर्व भागांतून असंख्य माणसे त्यांची रंगीबेरंगी स्वप्ने, ध्यास घेऊन पूर्ण करण्यासाठी सतत येत असतात. काहीजण नेटाने, अथक प्रयत्नाने त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अविस्मरणीय यश प्राप्त करतात. त्यांच्या अंगभूत कलेचा सतत रियाझ करून, … Continue reading महाराष्ट्र भूषण : आशाताई भोसले यांची आठवण

 ज्ञानपीठ पुरस्कार लेख ४ : 

  ‘द.रा. बेंद्रे : एक द्विभाषिक साहित्यिक’    या पुरस्काराच्या निमित्ताने अनेक रंजक गोष्टी आपल्या समोर येतात. डॉ. बेंद्रे हे मूळचे मराठी भाषिक असूनही त्यांचे बहुतांश लेखन कानडी भाषेत झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटक एकमेकांची शेजारी राज्ये असल्याने सीमावर्ती भागांमध्ये अनेक जणांना दोन्ही भाषा येतात. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त आठ कानडी लेखकांकडे नजर टाकली तर बेंद्रे यांच्याशिवाय आणखी पाचांचा मराठीशी कमी-अधिक प्रमाणात संबंध राहिला आहे. गिरीश कर्नाड व विनायक कृष्ण … Continue reading  ज्ञानपीठ पुरस्कार लेख ४ : 

महाकवी मोरोपंत : (१)

संस्कृत विद्वान मोरोपंतांचे लेखन हा न संपणारा वाचनाभ्यास आहे. जन्म शके १६५१ ते मृत्यू शके १७१६ या अवघ्या ६५ वर्षांच्या आयुष्यातील १५ वर्षे बाल्य आणि शिक्षणाची धरली तरी ५० वर्षं  निरंतर लेखनध्यास घेतलेला हा विलक्षण कवी. त्यांची काव्यसंपदा सूचीच थक्क करणारी आहे.  १)भारत १८ पर्वे २)भागवत दशम स्कंध आणि काही आख्याने ३)१०८रामायणे वेगवेगळ्या वृत्तांतली आणि वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टीतून पाहिलेली ४)विविध पदे, साक्या, केकावलीसारखी काव्ये.  ५)सीतागीत   … Continue reading महाकवी मोरोपंत : (१)

काफ्का आणि डॉ. रॉबर्ट क्लॉपस्टॉक पत्र-मित्र संवाद    

   मागची रांग मध्यभागी डॉ  रॉबर्ट क्लॉपस्टॉक,पुढची रांग उजवीकडून दुसरे काफ्का      पत्रलेखन हे जिवंत असते. कार्ड, पिक्चर पोस्टकार्ड, कागदावर शाईत, पेन्सिलीने  लिहिलेली पत्रे, टाईप केलेली पत्रे  या सगळ्यांना एक काया असते. या कायेची किमया इ-मेल मध्ये नाही. पाश्चात्त्यांना – अगदी तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य कुटुंबांतील पाश्चात्त्यांना – त्यांच्या आजी-आजोबांची, मित्रांची, नातेवाइकांची पत्रे जपून, पुढच्या पिढीला देण्याचे वेड असते. लेखक, विचारवंत, विज्ञानवंत, महिला असो वा पुरुष यांचा … Continue reading काफ्का आणि डॉ. रॉबर्ट क्लॉपस्टॉक पत्र-मित्र संवाद    

जपानवारी (पूर्वार्ध)

 आम्ही चौघेजण गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शारदशोभा (Autumn Colours🍁) बघायला आणि हिमवर्षा अनुभवायला म्हणून जपानला गेलो. चौघे म्हणजे मी, माझी ‘ही,’ माझा मित्र संकेत आणि त्याची ‘ही’. माझी ताई (चुलत बहीण) कामानिमित्त गेली ३ वर्षे टोकियोमध्ये असते. तिच्याकडे जाणे, आमच्या भाचराला (वय वर्ष ६) भेटणे असाही या वारीचा भाग होता.     नियोजनाची सुरुवात मे महिन्यापासूनच झाली होती. म्हणजे विमानाचं तिकीट काढून झालं. मग जपानबद्दल यू ट्यूबवर … Continue reading जपानवारी (पूर्वार्ध)

ज्ञानपीठ पुरस्कार लेख ३

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते  ‘तेलगू कविसम्राट’  विश्वनाथ सत्यनारायण     १९६५ साठीचे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जी.शंकर कुरूप यांच्यानंतर आज आपण थेट १९७०चे मानकरी विश्वनाथ सत्यनारायण यांचा परिचय करून घेणार आहोत. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे या लेखमालेत चौदा भाषांचे प्रतिनिधित्व असणार आहे. अर्थात एखाद्या भाषेच्या लेखकाबद्दल लिहिताना त्या भाषेतील इतर पुरस्कारप्राप्त लेखकांची थोडक्यात का होई ना, ओळख होईलच. पोत्तु श्रीरामुलू यांच्या आमरण उपोषणामुळे अस्तित्वात आलेले आंध्र प्रदेश हे … Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार लेख ३

ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी 

‘महाकवी जी. शंकर कुरूप’ गेल्या महिन्यातील लेखात आपण विविध साहित्यिक पुरस्कार आणि विशेषकरून ‘ज्ञानपीठ पुरस्कारां’ची माहिती घेतली. ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे अशा सतरा साहित्यिकांचा यापुढील लेखांतून आपण परिचय करून घेणार आहोत.  तसे पाहता आतापर्यंत एकूण ६५ लेखकांच्या गळ्यात ज्ञानपीठ पुरस्कारांची माळ पडली आहे. त्या सर्वांचाच परामर्श घेणे शक्य नाही आणि मुळात त्याची आवश्यकतादेखील नाही. आपणांपैकी बरेच जण प्रामुख्याने मराठीतील साहित्यच वाचतो, काही प्रमाणात इंग्रजीदेखील(मूळ … Continue reading ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी 

गोष्ट बेंगलोरच्या उत्सवाची…

कोणतेही शहर हे एका रात्रीत घडत नसते. शहरातील रस्ते, इमारती, पुतळे इतकेच काही शहराची ओळख घडवत नसतात, तर त्या शहरात घडणार्‍या सांस्कृतिक गोष्टीदेखील तितक्याच महत्त्वाच्या असतात.  त्यामुळेच जयपूरसारखे शहर आता फक्त हवामहालामुळे नव्हे तर तिथल्या लिटरेचर फेस्टिव्हलमुळेदेखील ओळखले जाते. दर दोन वर्षांनी भरणारे कोची बिएन्नेल हेतर जगभरातील कला रसिकांचे हक्काचे ठिकाण. तसेच महत्त्व आहे मुंबईच्या काळा घोडा फेस्टिव्हलचे. जगभरात असे अनेक फेस्टिव्हल भरत असतात, फक्त … Continue reading गोष्ट बेंगलोरच्या उत्सवाची…

ज्ञानपीठ पुरस्कार : लेख १

भारतीय साहित्य क्षेत्रात  सर्वोच्च शिखर मानल्या जाणाऱ्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित शब्दप्रभूंच्या जीवनप्रवासाचा आणि त्यांच्या अजरामर साहित्याचा वेध घेणारी नवी लेखमाला ‘अंतर्नाद’मध्ये सुरू होत आहे. या प्रतिभावंतांच्या लेखणीची महती आणि त्यांच्या साहित्यातील मर्म उलगडण्याचा हा एक प्रयत्न आहे. ज्येष्ठ लेखक प्रमोद केशव बापट ही लेखमाला शब्दांकित करत आहेत. संपादक  साहित्यिक पुरस्कारांसंबंधात चार शब्द…. कोणत्याही क्षेत्रातील उत्तम कामगिरी पुरस्काराने गौरविली जाते; मग ते विज्ञान असो, सामाजिक क्षेत्र … Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार : लेख १