ज्ञानपीठ पुरस्कार लेख ३

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते  ‘तेलगू कविसम्राट’  विश्वनाथ सत्यनारायण     १९६५ साठीचे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जी.शंकर कुरूप यांच्यानंतर आज आपण थेट १९७०चे मानकरी विश्वनाथ सत्यनारायण यांचा परिचय करून घेणार आहोत. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे या लेखमालेत चौदा भाषांचे प्रतिनिधित्व असणार आहे. अर्थात एखाद्या भाषेच्या लेखकाबद्दल लिहिताना त्या भाषेतील इतर पुरस्कारप्राप्त लेखकांची थोडक्यात का होई ना, ओळख होईलच. पोत्तु श्रीरामुलू यांच्या आमरण उपोषणामुळे अस्तित्वात आलेले आंध्र प्रदेश हे … Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार लेख ३

ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी 

‘महाकवी जी. शंकर कुरूप’ गेल्या महिन्यातील लेखात आपण विविध साहित्यिक पुरस्कार आणि विशेषकरून ‘ज्ञानपीठ पुरस्कारां’ची माहिती घेतली. ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे अशा सतरा साहित्यिकांचा यापुढील लेखांतून आपण परिचय करून घेणार आहोत.  तसे पाहता आतापर्यंत एकूण ६५ लेखकांच्या गळ्यात ज्ञानपीठ पुरस्कारांची माळ पडली आहे. त्या सर्वांचाच परामर्श घेणे शक्य नाही आणि मुळात त्याची आवश्यकतादेखील नाही. आपणांपैकी बरेच जण प्रामुख्याने मराठीतील साहित्यच वाचतो, काही प्रमाणात इंग्रजीदेखील(मूळ … Continue reading ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी 

ईश्वरभक्ती, अध्यात्म वगैरे 

भारतीय समाजात पूर्वापारपासून धार्मिकता कमी-अधिक प्रमाणात बहुसंख्य लोकांमध्ये असल्याचे दिसून येते. धार्मिकतेचा प्रभाव हिंदू समाजामध्ये मर्यादित प्रमाणात तर मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजात कितीतरी जास्त असल्याचे अनुभवायला येते. विशेष म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पंचाहत्तर वर्षांच्या काळात साक्षरतेचे प्रमाण खूपच वाढले, विज्ञानाची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली; तरी त्यामुळे अधार्मिक, विवेकवादी प्रवृत्ती असणार्‍यांच्या संख्येत वाढ झाल्याचे खातरीपूर्वक सांगता येत नाही. धार्मिकतेचा आविष्कार वेगवेगळ्या स्वरूपांत दृष्टीस पडतो : जप-जाप्य, … Continue reading ईश्वरभक्ती, अध्यात्म वगैरे