‘उपासमारीचा कलाकार’ काफ्काची ‘सत्यकथा’      

प्रत्येक कलेला इतिहास असतो. युरोपीय ललितकलेला – म्हणजे लघुकथा, नाटक, कादंबरी वगैरे कलाकृतींनासुद्धा इतिहास आहे. हा नुसता साहित्याचा इतिहास नसून सांस्कृतिक, सामाजिक  -राजकीय, असे अनेक पदर त्याला असतात.‘हंगर आर्टिस्ट’ ही काफ्काची महत्त्वाची कथा; कारण ‘माझे सगळे साहित्य जाळून टाक पण काही कथा जाळू नको’ असे काफ्काने त्याचा मित्र मॅक्स ब्रॉडला सांगितले होते. ललितकृतीतील ‘हंगर आर्टिस्ट’ ही एक  ही मोठी विदारक कथा आहे; पण ‘ती जाळू … Continue reading ‘उपासमारीचा कलाकार’ काफ्काची ‘सत्यकथा’      

मोरोपंत – भाग ४

दोहा रामायण ही मोरोपंतांची आणखी एक कलाकृती.  दोह्यासंबंधी थोडी माहिती देते.  दोहा हा अर्धसम  मात्रिक छंद आहे. यात दोन ओळींत चार चरण असतात. पहिल्या आणि तिसऱ्या चरणात १३ मात्रा आणि दुसऱ्या आणि चौथ्या चरणात ११ मात्रा असतात.  विषम चरणाच्या सुरुवातीला ‘ज’गण (लघू-गुरू-लघू) नसावा असा संकेत आहे.( मात्र याला काही अपवाद आहेत.)  शेवटची अक्षरे : समचरणातील शेवटचे अक्षर गुरू आणि त्याआधीचे अक्षर लघू असणे आवश्यक आहे. … Continue reading मोरोपंत – भाग ४

झुकझुक आगीनगाडी :१८  

मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडल (कार्यक्षेत्र : वाडी—ते दौंड, दौंड ते मनमाड, लातूर ते कूर्डवाडी ते मिरज) मध्ये अतिवेगाने खूपच सुधारणा  होत होत्या आणि त्यासुद्धा माझ्या कार्यकाळातच होत होत्या. त्यामुळे मी जास्तच तंत्रस्नेही होऊ लागलो. आम्हां इंजीनियर लोकांना Android सारखे कायम अपडेट राहवेच लागते. “बदला, नाहीतर नष्ट व्हा!” ‘मला माहीत नाही, येत नाही’ अशा सबबी  अजिबात  चालत नाहीत. ह्यासाठी रेल्वे प्रशासन  आमच्यावर नवनवीन तंत्रज्ञान शिकवण्यासाठी खूप … Continue reading झुकझुक आगीनगाडी :१८  

रविकिरण मंडळाची कविता

‘How many are you then, said I, if they two are in heaven? Quick was the little maid’s reply, oh master! We are seven.’ ‘मराठी नाट्यछटा’ या छोटेखानी पुस्तकाच्या प्रारंभी कवी गिरीश यांनी  उद्धृत केलेल्या या ओळी रविकिरण मंडळाच्या सदस्यांची स्मृती जागवतात. त्यांनी अर्पणपत्रिकेत लिहिलंय, ‘या करुण सुंदर ओळींची यथार्थ  स्मृति करून देणाऱ्या माझ्या प्रिय सहकाऱ्यांना!’    तीस वर्षांपूर्वी साहित्य अकादमीतर्फे ‘रविकिरण मंडळाची निवडक कविता’ हा … Continue reading रविकिरण मंडळाची कविता

चित्रओळी (३) : चित्रमय पोथ्या : भाग १

मराठी काव्याच्या इतिहासामध्ये एक फार वैशिष्ट्यपूर्ण परंपरा पाहायला मिळते. ती परंपरा आहे द्रौपदीच्या धाव्यांची. वस्त्रहरणप्रसंगी द्रौपदी श्रीकृष्णाचा धावा करते आणि तो तिच्या मदतीकरिता अवतरतो, हे साधारण कथानक. जेव्हा दुःशासन द्रौपदीच्या साडीस हात घालतो, तिथपासून हे कथानक  एक वेगळे वळण घेते. इथे मराठी कवी मुख्य कथानक जरा बाजूला ठेवून, कृष्णाने द्रौपदीस पुरवलेल्या साड्यांचे वर्णन करू लागतात. यामध्ये साड्यांची नावं, प्रकार, त्यांच्या पेठा, रंग असे सगळे तपशील … Continue reading चित्रओळी (३) : चित्रमय पोथ्या : भाग १

 वाल्मीकीयरामायणाचे उत्तरकांड

भारतीय जनमानसावरचे रामकथेचे गारुड केवळ असामान्य आहे. कितीही वेळा वाचली, पाहिली, तरी मन भरत नाही, अशी ही कथा. त्यामुळे अनेक लेखकांकडून तिच्याविषयी लिहिणे हे घडत आलेले आहेच. आजही तिच्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेबद्दल लिहिले जाते. ती कथा आपल्या भाषेत लिहिणे, एवढेच नव्हे तर आपल्या मनाप्रमाणे तिच्यात काही बदल करून लिहिणे, शिवाय तिच्यात अन्य कथा रचून मिसळणे वा घुसडणे हेही घडत आले आहे. त्यामुळेच, रामायणांची संख्या तीनशे आहे, … Continue reading  वाल्मीकीयरामायणाचे उत्तरकांड

मोरोपंत भाग ३ : बालमंत्ररामायण

रामाविषयीची भक्ती व्यक्त करण्यासाठी १९०० कडव्यांचं मंत्ररामायण लिहूनही मोरोपंतांचं समाधान झालं नाही. कॅलिडोस्कोपमधून  विविध कोनांतून वेगवेगळ्या आकृती निरखाव्यात तसं मोरोपंत वेगवेगळ्या कोनांतून रामायण निरखत होते. मंत्ररामायणाप्रमाणे बालमंत्ररामायणातही श्रीरामाचा जप त्यांनी गुंफला आहे.   बालमंत्ररामायण हे  रामाच्या लहानपणीचे वर्णन नसून ते केवळ ३९ कडव्यांचे लहानसे रामायण आहे म्हणून या काव्याला बालमंत्ररामायण संबोधले आहे.  मंत्ररामायण आणि बालमंत्रारामायण यांत सुरुवातीच्या ९ व्या ओळीत कथेत  फरक दिसतो.  मंत्ररामायणात पुत्रप्राप्तीसाठी … Continue reading मोरोपंत भाग ३ : बालमंत्ररामायण

ज्ञानपीठ पुरस्कार : लेख ६

 अमृता प्रीतम : भारतीय साहित्यातील एक लखलखते आणि बंडखोर नाव  मल्याळम, तेलगू , कन्नड आणि मराठी या चार भाषांमधील साहित्यिकांचा परिचय करून घेतल्यानंतर आपण आज पाचव्या भाषेतील लेखकाला भेटणार आहोत आणि ‘पाच नद्यांचा प्रदेश’ – पंजाबमधील ते सर्वपरिचित नाव आहे अमृता प्रीतम यांचे. त्यांना १९८१ साठीचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. आजच्या भारतातील पंजाबी भाषकांची संख्या ३.५ कोटींच्या आसपास असली, तरी पाकिस्तानातील जवळपास १० कोटी आणि … Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार : लेख ६

काफ्काची लघुकथा – कायाबदल        

  शेक्सपिअरच्या किंग लियर या नाटकात एक मजेदार वाक्य आहे त्याचा आशय ‘वात्रट पोरे किड्यामुंग्यांना खेळ म्हणून मारतात, त्याच प्रमाणे हे देव त्यांचा खेळ म्हणून माणसांना मारतात. नियतीचा व्यवहार असा क्रूर आणि मनमानी असतो. नियती निष्ठुर असेलही;  पण माणूस उलट्या काळजाचा आणि दुसऱ्याला जिवंत सोलणारा असतो. समाजात हे आपण पाहत असतो. जेव्हा हे वास्तव ललितकलेच्या रूपात वाचकाच्या नजरेसमोर येते तेव्हा ते झोंबते, डोळे पाणावतात, मन हेलावते. … Continue reading काफ्काची लघुकथा – कायाबदल        

ज्ञानपीठ पुरस्कार : लेख ५

वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर : जीवनमूल्यांना समर्पित साहित्यिक  ज्ञानपीठ पुरस्कारांच्या दशकपूर्ती वर्षात विष्णु सखाराम खांडेकर या मराठी साहित्यविश्वाच्या सुपुत्राला हा सन्मान मिळाला. तसे पाहता आदल्याच वर्षी हा पुरस्कार मिळवणारे द.रा.बेंद्रे हे मूळचे मराठी भाषकच;पण त्यांचे बहुतांश आणि महत्त्वाचे साहित्य कन्नड भाषेत होते. १९७४ मध्ये हा पुरस्कार प्राप्त करणारे खांडेकर हे तत्कालीन लेखकांमधील ज्येष्ठ होते, पण पुरस्कारासाठी हे काही एकमेव वा सर्वात महत्त्वाचे कारण नव्हते. त्यांच्या … Continue reading ज्ञानपीठ पुरस्कार : लेख ५