महाकवी मोरोपंत : (१)

संस्कृत विद्वान मोरोपंतांचे लेखन हा न संपणारा वाचनाभ्यास आहे. जन्म शके १६५१ ते मृत्यू शके १७१६ या अवघ्या ६५ वर्षांच्या आयुष्यातील १५ वर्षे बाल्य आणि शिक्षणाची धरली तरी ५० वर्षं  निरंतर लेखनध्यास घेतलेला हा विलक्षण कवी. त्यांची काव्यसंपदा सूचीच थक्क करणारी आहे.  १)भारत १८ पर्वे २)भागवत दशम स्कंध आणि काही आख्याने ३)१०८रामायणे वेगवेगळ्या वृत्तांतली आणि वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टीतून पाहिलेली ४)विविध पदे, साक्या, केकावलीसारखी काव्ये.  ५)सीतागीत   … Continue reading महाकवी मोरोपंत : (१)

अर्धभद्रक बंध

हा सर्वात अवघड बंध मानला जातो.  छंद अनुष्टुभ (चाल : भीमरूपी महारुद्रा)  नाना  वि  द्या  क था वा  क ना ट्य  नि  वा  स्तुगा  न  वा वि  नि  यो  गा  व  री  गा  था द्या  वा  गा  जे  स  व  स्तु   क यामध्ये विविध विद्या,  विविध कलांनी आपलं जीवन कसं समृद्ध केलं आहे हा विचार मांडायचा प्रयत्न आहे.  नाना विद्या, कथासौंदर्य, वाक (वाणी) नाट्य, … Continue reading अर्धभद्रक बंध

सर्वतोभद्र बन्ध 

सगळ्या बाजूंनी – म्हणजे डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, वरून खाली, खालून वर असा वाचला असता तसाच चरण येतो अशा काव्याला सर्वतोभद्र बंधकाव्य म्हणतात.भारवीने किरातार्जुनीयम् मध्ये या बंधाची रचना केली आहे. अतिशय अवघड असा हा बंध.या काव्यप्रकाराचा विचार करताना माणसाचा पैशाचा लोभ, माज यांचा विचार माझ्या मनात आला. ही वासना नासून जावी अशी प्रार्थना मनात आली.हवं हवं करून जमवलेल्या संपत्तीचा चांगल्या कारणासाठी विनियोग केला नाही, माझ्या … Continue reading सर्वतोभद्र बन्ध 

शंकुकाव्य

या काव्यप्रकाराचा  उगम हल्लीचाच असावा. पहिल्या ओळीत जितकी अक्षरं असतात त्यापेक्षा एक अक्षर कमी दुसऱ्या ओळीत, असं एक-एक अक्षर कमी कमी करत शेवटी एका अक्षरावर यायचं. त्यामुळे काव्याचं रूप शंकूसारखं निमुळतं दिसतं. या बंधात्मक प्रकाराचा प्रयत्न केला आहे. मला एकच नियम माहीत आहे — अक्षरसंख्येचा. जाणकारांनी आणखी नियम सांगितले तर फारच आनंद होईल.  पहिली ओळ २४ अक्षरांची आहे. मग २३,२२ असं करत एकावर आले आहे.  … Continue reading शंकुकाव्य

सर्जनसोहळा  

“अर्थहीन असतं भाषेचं हत्यार… मनातले सारे उत्कट भाव पुरासारखे थांबतात मौनाच्या उंबरठ्याशी येऊन हिरमुसल्या पाण्यासारखे पुन्हा आत परततात चार-दोन औपचारिक शब्दांचा आसरा घेऊन अडखळत बाहेर पडतात, तिथे अडतात, विरतात” शांताबाईंचे शब्द आधाराला घेऊन मनाची  उत्कटता मांडू बघते आहे.   “आसमन्ताचे अपार ऐश्वर्य शिरते आपल्या आत रुजतात कोवळे हिरवे प्राण अशाश्वत मातीत देहाचे आवरण फाटून जाते अकस्मात क्षणभर होतो आपण  स्थलकालाच्या अतीत!” असे स्थलकालाच्या अतीत होण्याचे क्षण … Continue reading सर्जनसोहळा  

काव्यचमत्कृती : गोमूत्रिका बंध

बांधुनि बंधांत विविध गोमूत्रिका बंध गोमूत्रिका बंध हे नाव वाचून जरा धक्का बसतो. या नावाचं स्पष्टीकरण असं – गाय, बैल सरळ चालत असतात पण त्यांच्या मूत्रविसर्जनाची धार  चतुष्पाद गतीमुळे नागमोडी होते.  त्या नागमोड्या गतीप्रमाणे वाचता येईल असा रचलेला हा बंध म्हणजे गोमूत्रिका बंध!  किरातार्जुनीयम् सर्ग १५ श्लोक १२ नासुरोऽयं न वा नागो धरसंस्थो न राक्षसः| ना सुखोऽयं नवाभोगो धरणिस्थो हि राजसः|  नासुरोऽयं चं पुढच्या ओळीत   … Continue reading काव्यचमत्कृती : गोमूत्रिका बंध

काव्यचमत्कृती 

या नवीन सदरात प्राचीन काळातील बंधरचनांचा अभ्यास करून  सुषमा जोशी स्वरचित काव्यरचना मांडणार आहे .  १)अष्टदल कमल बंध  काव्याचं सौंदर्य नक्की कशाकशांत असतं? शब्द, मांडणी, विचार, जाणिवेत झिरपणारी अनुभूती! कधी विषयाचं सौंदर्य, कधी कल्पनाचातुर्य, कधी शाब्दिक सौंदर्य,  कधी छंद-वृत्तांमुळे  लाभलेलं गेयतेचं सौंदर्य; तर कधी यमकादी अलंकारांनी लहडून आलेलं सौंदर्य.  मम्मट हे संस्कृताचार्य. अकराव्या शतकातील काश्मिरी पंडित. त्यांच्या ‘काव्यप्रकाशा’मुळे संस्कृत काव्यशास्त्र अतिशय प्रगल्भ झालं.  अकराव्या शतकात … Continue reading काव्यचमत्कृती 

संत, पंत, तंत – काव्यविषयक लेखमाला – रघुनाथ पंडित भाग ५

   पंडित कवींचा काळ चार-साडेचारशे  वर्षांपूर्वीचा. यानंतरच्या काव्यात हळूहळू गेयतेपेक्षा अर्थाला प्राधान्य  आलं. अर्थप्रधान होण्याच्या प्रक्रियेत काही काव्यलेणी गळून पडली.  सणावाराला पणजीबाईंची नथ हौशीनं घालावी तशी एखादी कविता सवृत्त, सालंकृत दिसू लागली. पंतकवींच्या काळातही अशीच प्रक्रिया घडली होती. ओवीतून बदल घडवत संस्कृत छंद, मराठी वृत्तं, अलंकारांमधून काव्य सजत गेलं.  अलंकारांची ओढ आणि   द्व्यर्थी रचना हा बौद्धिक काव्यखेळ  झाला. रघुनाथ पंडितांची भाषाशैली, संस्कृतप्रचुर भारदस्त मराठी भाषा … Continue reading संत, पंत, तंत – काव्यविषयक लेखमाला – रघुनाथ पंडित भाग ५

संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला : रघुनाथ पंडित भाग ४ 

यत्नेंविना इष्ट फलप्राप्ती होते| प्रहर्षणालंकृति जाण बा ते|| काहीही कष्ट न घेता ईप्सित सहजसाध्य होतं त्या योगायोगाला प्रहर्षण म्हणतात.  दमयंतीच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून विरहार्त झालेल्या नळराजाला दमयंतीचं कौतुक सांगणारा राजहंस अचानक भेटतो.  नळराजाची विरहावस्था आणि अचानक भेटलेला सुवर्णहंस यांचं वर्णन करताना प्रहर्षण अलंकारासह विरहांधकाराचं रूपकही ते गुंफतात. चक्रवाक पक्ष्यासारखाच रात्रीच्या ताटातुटीने तळमळत मी फिरलो असतो ही विरहार्त उपमा चपखल आहे.  वेल्हाळ ते न दिसतां विरहांधकारी … Continue reading संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला : रघुनाथ पंडित भाग ४ 

संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला : रघुनाथ पंडित भाग ३

नळराजाचं कौतुक करताना रघुनाथ पंडितांना विलक्षण काव्यस्फूर्ती येते. पुन्हा पुन्हा नळाची स्तुती करताना रघुनाथ पंडित विविध दृष्टान्त, उपमादी अलंकार गुंफत राहतात.  या अलंकारांचं आणि स्तुतीचं निधान एकच असलं, अलंकारही पुनः पुन्हा तेच वापरले असले तरी कल्पनाचातुर्यामुळे ते रंजक ठरतात – कसे ते पाहू या!   प्रतीप अलंकार ज्याची उपमा द्यायची त्याचंच खुजेपण, कमीपण दाखवून देत उपमेयच कसे वरिष्ठ आहे हे दाखवत त्याचे कौतुक करणारा हा अलंकार!  … Continue reading संत, पंत, तंत — काव्यविषयक लेखमाला : रघुनाथ पंडित भाग ३