‘संस्कृति’कारण : मानसिक समाधानाचा मार्ग

मानवजातीच्या विकासप्रक्रियेत समाजाचं रूप सतत बदलत गेलं. अविकसित अवस्थेत माणसाचे प्रमुख प्रश्न होते : अन्न, निवारा आणि उपजीविका. जगण्यासाठी लागणाऱ्या या तीन गरजाच त्याच्या आयुष्याचं केंद्रबिंदू होत्या. संघर्ष होता फक्त अस्तित्व टिकवण्याचा. हे आदिमानवाच्या स्थितीचं वर्णन आहे का? नाही! अगदी स्वातंत्र्योत्तर भारतातही अनेक ठिकाणी हीच परिस्थिती दिसून येत होती. त्यांच्यासाठी जीवन म्हणजे फक्त ‘जगणं’ – एवढंच! हळूहळू भारतीय समाज विकासाच्या टप्प्यात प्रवेश करू लागला. माणूस … Continue reading ‘संस्कृति’कारण : मानसिक समाधानाचा मार्ग

एका लेटरहेडची गोष्ट

काय झाले, सध्या आमच्या घरात, घरातील काही खोल्यांचे जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे हस्तांतरण चालू आहे. चिरंजीव आणि सूनबाई ह्यांनी घराचा ताबा घेतलेला आहे; आमच्या आयुष्यभर जपून ठेवलेल्या  आणि दहा-वीस वर्षे आम्हीच ढुंकूनदेखील न बघितलेल्या अशा सर्व गोष्टींचा, वस्तूंचा, पुस्तकांचा एका अर्थाने पंचनामा चालू आहे. हे कचरा निर्मूलन (त्यांच्याच  शब्दात)  चालू असतानाच काही काही वेळा आमच्या हातामध्ये दुर्मीळ खजिना लागत आहे आणि त्यातच मन रमून जात … Continue reading एका लेटरहेडची गोष्ट

मन वढाय वढाय भाग ८ 

स्किझोफ्रेनिया आणि लग्न  मागील दोन लेखांमधून आपण स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराची, त्यावरील उपचारांची माहिती घेतली. त्याच प्रमाणे नियमित उपचार घेणारे रुग्ण आणि काही कारणांनी उपचार अर्धवट घेतलेले रुग्ण यांचे अनुभव बघितले. या लेखामध्ये मी स्किझोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांना आणि त्यांच्या घरच्यांना सतावणाऱ्या एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर थोडक्यात लिहिणार आहे. स्किझोफ्रेनिया हा आजार असणाऱ्या रुग्णांचे लग्न हा सध्याचा एक गंभीर प्रश्न आहे.  मागील लेखात मी सांगितलंच … Continue reading मन वढाय वढाय भाग ८ 

वेडी माणसे

चित्रकार ज्या वेळी एखादे ऑन द स्पॉट स्केच करत असतो, त्या वेळी कितीतरी गोष्टी आजूबाजूला घडत असतात. त्या प्रत्यक्ष घडत असलेल्या घटना कधी मनाला खूप आनंदी करून जातात; तर एखादी घटना मनाच्या आतपर्यंत खूप खोलवर जखम करणारी यातना देणारी असते. अशा वेगवेगळ्या घटनांचा चित्रनिर्मिती करताना नक्कीच प्रभाव पडत असतो.  चित्रकाराच्या मनात ती घटना आयुष्यभर लक्षात राहणारी ठरते.          कृष्णानदीच्या किनारी वसलेल्या वाई गावाजवळ आमचे पांडेवाडी गाव … Continue reading वेडी माणसे

झुकझुक आगीनगाडी: भाग ७

माझा रेल्वेतील दिनक्रम व्यवस्थित चालू होता. हळूहळू, अनेक मुलींचे पालक मला एक योग्य स्थळ म्हणून पाहू लागले. ही कुजबुज माझ्या आईच्या कानावर पडू लागली आणि तिच्यातील वरमाई जागी झाली. अर्थात मुलाचे लग्न व्हावे आणि सुनेचे मुख पाहावे, ही तिची स्वाभाविकच इच्छा होती. माझेही लग्नाचे वय झाल्यामुळे मी फारसे आढेवेढे न घेता लग्नासाठी होकार दिला. मुलाच्या लग्नाची मोहीम फत्ते करण्यासाठी ती जोरात कामाला लागली. २७ स्थळे … Continue reading झुकझुक आगीनगाडी: भाग ७

प्रश्नोपनिषद : ऑगस्ट  २०२५

मंडळी,   आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.  मराठीतील एक ख्यातनाम  समीक्षक रा. ग.  जाधव आपल्या ‘माझे चिंतन’ या पुस्तकात म्हणतात, “ माझी अशी श्रद्धा आहे, की १००% सेक्युलर  मीमांसेलाही प्राचीनातील श्रेष्ठ साहित्य कृतींचे अवमूल्यन करता येणार नाही.  यासाठी समग्र सांस्कृतिक दृष्टीकोन नि स्वच्छ इतिहासदृष्टी यांची गरज मात्र आहे.  मराठी समीक्षेला व प्रज्ञेला हे केवढे तरी … Continue reading प्रश्नोपनिषद : ऑगस्ट  २०२५

मन वढाय वढाय :भाग ७ 

स्किझोफ्रेनिया भाग २ गोष्ट लखू आणि रेखाची. मागील भागामध्ये आपण स्किझोफ्रेनिया या गंभीर आणि प्रदीर्घ आजाराची माहिती घेतली आणि प्रातिनिधिक स्वरूपातील एका रुग्णाची कथादेखील वाचली. आज मी तुम्हांला तीन वेगवेगळ्या रुग्णांच्या गोष्टी सांगणार आहे. लखूपासून आपण सुरुवात करू या. लखू  पंढरपूरजवळच्या एका वस्ती-वजा खेडेगावात लखूचे कुटुंब राहत होते. लखू, त्याचा मोठा भाऊ आणि आई-वडील. त्याच्या दोन्ही  बहिणी लग्न होऊन आपापल्या संसारांत व्यग्र होत्या. लखूच्या आईला … Continue reading मन वढाय वढाय :भाग ७ 

अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(१) 

आकाशवाणीचं हे ….                                              ‘उदानस्य पुनः स्थानं नाभ्युरः कण्ठं एव च।                                               वाक्प्रवृत्तिः प्रयत्नोर्जाबलवर्णादि कर्म च॥’ (उदान वायूचे स्थान नाभी, कंठ व छाती असून वाक्प्रवृत्ती म्हणजे बोलणे, गाणे, कंठातून आवाज येणे ही कार्ये उदानाच्या प्रेरणेमुळे होतात. प्रयत्न, ऊर्जा, ताकद, कांती या गोष्टीही उदान वायूवरच अवलंबून असतात.) भारतीय आकाशवाणीच्या कामकाजाला सुरुवात होऊन शतकपूर्ती झाली.  भारतीयत्वाची जी अनेक लक्षणे आहेत त्यांमध्ये आकाशवाणी ऐकणे हे एक महत्त्वाचे लक्षण म्हणावे लागेल.  … Continue reading अभिवाचन : शतकपूर्तीच्या वळणवाटा(१) 

कर्ममार्गी शेतकरी भक्तिमार्गाकडे का वळले असावेत…?

नुकतीच आळंदी पंढरपूर आणि देहू पंढरपूर पायी वारी पार पडली. ठरलेल्या वेळी निघून ठरलेल्या दिवशी ज्ञानेश्वर माउली आणि तुकोबाराय यांच्या पालख्या पंढरपूरला पोचल्या. लाखो वारकरी दोन्ही पालखी मार्गांनी चालत ‘विठ्ठल’ नामाचा आणि ‘ज्ञानेश्वर माउली तुकाराम’ नामाचा घोष करत पंढरपुरी पोचले. अनेक वर्षांपासून मला वारीत चालत जाण्याची इच्छा होती. माझे वडील नेमाने पंढरीची चैत्री वारी करायचे. अगदी लहान वयात मी आषाढी आणि चैत्री वारीला त्यांचेबरोबर गेलोय; … Continue reading कर्ममार्गी शेतकरी भक्तिमार्गाकडे का वळले असावेत…?

प्रश्नोपनिषद : जून २०२५ 

मंडळी,   आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.  ‘बंध- अनुबंध ‘या आपल्या आत्मचरित्रात लेखिका कमल पाध्ये यांनी समाजकार्याच्या प्रवृत्तीच्या संदर्भात  काही लिहिले आहे. ‘खरं म्हणजे प्रकल्प करत असतानाच ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती. समाजकार्याबद्दल भरपूर मोल घेऊन कार्य करणं समाजकार्याच्या पाश्चात्त्य  कल्पनेत मानाचं मानलं जातं. आम्ही काहीही न घेता किंवा केवळ खर्चापुरते थोडे पैसे घेऊन … Continue reading प्रश्नोपनिषद : जून २०२५