शब्दांविना संवाद, डोळे बोलतात सारे… 

काही दिवसांपूर्वीचा  ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्याना’मधील हा विलक्षण अनुभव – अनुभव म्हणण्यापेक्षा एक अनुभूती असे म्हणू या हवे तर…  नशीब म्हणा, योगायोग म्हणा, की काहीही असो, मला जंगलात किंवा सातारा शहराच्या आसपास, अगदी माझ्या घराच्या दारातदेखील  बिबट्याचे दर्शन पुष्कळ वेळा झाले आहे. प्रत्येक जंगल सफारीमध्येतर मला हमखास व्याघ्रदर्शन होणार हे नक्की असते.  बिबट्या पुष्कळ वेळा मला अगदी निकट दर्शन देऊन गेला आहे. वाघ मात्र तसा … Continue reading शब्दांविना संवाद, डोळे बोलतात सारे… 

एका लेटरहेडची गोष्ट

काय झाले, सध्या आमच्या घरात, घरातील काही खोल्यांचे जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे हस्तांतरण चालू आहे. चिरंजीव आणि सूनबाई ह्यांनी घराचा ताबा घेतलेला आहे; आमच्या आयुष्यभर जपून ठेवलेल्या  आणि दहा-वीस वर्षे आम्हीच ढुंकूनदेखील न बघितलेल्या अशा सर्व गोष्टींचा, वस्तूंचा, पुस्तकांचा एका अर्थाने पंचनामा चालू आहे. हे कचरा निर्मूलन (त्यांच्याच  शब्दात)  चालू असतानाच काही काही वेळा आमच्या हातामध्ये दुर्मीळ खजिना लागत आहे आणि त्यातच मन रमून जात … Continue reading एका लेटरहेडची गोष्ट

स्वागत – आम्ही पुस्तकप्रेमी सातारकर समूह

वाचन चळवळ वाढावी, ‘समव्यसनी’ मित्रमैत्रिणी यांनी एकत्र यावे ह्या हेतूने अनेक समूह आजकाल व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर स्थापन झालेले असतात. अशाच एका ‘पुस्तकप्रेमी’ समूहाचा मी सभासद झालो, त्या समूहातील सदस्यांचे ग्रंथप्रेम आणि वाचनाचा आवाका बघून मी थक्क झालो, ठरवले, की असाच एखादा समूह आपण सातारकर पुस्तकप्रेमींसाठी सुरू करायचा. त्यातूनच स्फूर्ती घेत आम्ही सातारकर साहित्यप्रेमी मंडळींनी ‘वाचू आनंदे’ हा उद्देश ठेवून हा समूह २३ ऑगस्ट २०२१ रोजी … Continue reading स्वागत – आम्ही पुस्तकप्रेमी सातारकर समूह

एक वादळ शांत झाले.

वाई येथील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व, चतुरस्र लेखक, स्त्रीआरोग्य तज्ज्ञ, भाषांतरकार,  विज्ञाननिष्ठ डॉक्टर शंतनु अभ्यंकर यांचे अकाली निधन झाले.  त्यांना त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्राने वाहिलेली ही  शब्दसुमने.  काय बोलू? काय लिहू? शंतनु आज आपल्यात नाही. कधीतरी ही घटना नजीकच्या भविष्यकाळात घडणार होतीच. ती १५ ऑगस्ट रोजी घडली, इतकेच!  एक वादळ शांत झाले. त्यालाच नव्हे तर सर्व संबंधितांना तशी कल्पना होतीच. त्याचे आयुष्य कमी राहिले होते. त्याचे … Continue reading एक वादळ शांत झाले.

देवराया – देवाचे जंगल

पारंपरिक निसर्ग बेटे. मित्रहो,  ब्रह्मांडाची निर्मिती झाली,  पाठोपाठ आकाशगंगा, सूर्यमाला जन्म घेऊ लागल्या; मग त्यातच आपल्या वसुंधरेचा जन्म झाला.    त्यानंतर सृष्टीची निर्मिती होऊ लागली, मग त्या सृष्टीमध्ये सजीव उत्क्रांत झाले. शेवटच्या टप्प्यात मानवजात जन्मली, आणि मग त्यानंतर बहुदा, देवांचा जन्म झाला असावा. असे म्हणतात ना…  ‘देव दानवा नरे जन्मले…’ अगदी खरे असावे!  देव असो किंवा नसो, त्या वादात पडायचे नाही; पण माणसामध्ये देववृत्ती आणि दैत्यप्रकृती … Continue reading देवराया – देवाचे जंगल