आणिले टिपूनी अमृतकण : भाग २
‘मनी आणावे ते ते होते कृपा केलिया रघुनाथे प्रचिती येते’ समर्थ रामदासांचे हे शब्द ग. दि. माडगूळकरांच्या लेखन-प्रतिभेला तंतोतंत लागू पडतात. त्यांच्या गीतांच्या झोक्यांनी गाव-खेड्यातले चिमुकले डोळे झोपी जातात. ‘गोरी गोरी पान’, ‘नाच रे मोरा’ अशी बालगीतं शाळाशाळांची स्नेहसंमेलनं गाजवतात. ‘गीत-रामायण’नं ओसऱ्या राममय होऊन जातात. चित्रपटगीतांनी मराठी वाद्यवृंदांना ओळख मिळते. लावण्यांनी जत्रेच्या रात्री रंगतात. एके काळी कथा-पटकथा-संवाद-गीतं – ग. दि. माडगूळकर या शब्दांना सोन्याचं मोल … Continue reading आणिले टिपूनी अमृतकण : भाग २
