प्रतिसाद : अनिश्चितता, जानेवारी २०२६ अंकाचे संपादकीय.     

 प्रतिसाद : अनिश्चितता, जानेवारी २०२६ अंकाचे संपादकीय.       भारतीय समाजजीवनातील सामाजिक, राजकीय, व्यायसायिक आणि आर्थिक  अस्वस्थता हे शिक्षित तरुणांच्या अमेरिकेसारख्या देशात होणाऱ्या स्थलांतराचे मुख्य कारण आहे आणि या स्थलांतराच्या मागे खालील घटक कारणीभूत आहेत असे  संपादक डॉ.अनिल जोशी यांना  वाटते. त्यांच्या मताचा हा प्रतिवाद –  १ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील गोंधळ आणि अनिश्चितता  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न होणे, त्यांतील गोंधळ, पैशाचा भरमसाठ वापर … Continue reading  प्रतिसाद : अनिश्चितता, जानेवारी २०२६ अंकाचे संपादकीय.     

प्रतिसाद – डिसेंबर  २०२५

‘अंतर्नाद’ मधील(नोव्हेंबर २०२५)  बेंगळुरू विषयीचा लेख आवडला. २० नोव्हेंबर १९९४ ते २१  फेब्रुवारी १९९५ असे तीन महिने अध्ययनासाठी मला या शहरातील एका नामांकित संशोधन संस्थेत काढावे लागले. तेव्हा हे शहर आजच्याइतके घाईगर्दीचे धावपळीचे नव्हते; तरीही त्याच्या उगवणे ते मावळणेचा एक दमदार फ्लेवर, दरवळ मनीमानसी दाटून राहिला. ‘अस्तिसूत्र’ या माझ्या दीर्घकथेत ते तपशिलात आले आहे. व्हाईटफिल्ड, केंपगौडाचे नंदीमंदिर, इंदिरानगर उडुपी कॅफे ही सार्वकालिक दृष्टिरसनासुखाची आनंदनिधाने.  –प्रा. सुरेंद्र … Continue reading प्रतिसाद – डिसेंबर  २०२५

प्रतिसाद – ऑगस्ट २०२५

अर्कचित्र : मनस्विनी लाटकर   ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’  नुकताच आषाढी एकादशीला ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या नाट्यवाचनाचा प्रयोग पाहिला. मधुराणी गोखले आणि इतर कलाकारांनी इतकं सुरेख उभं केलेलं वारीचं चित्र पाहताना मला पंढरपूरच्या वारीतले माझे ते दिवस आठवले. अर्थात, संपूर्ण वारी मी कधी केली नाही; पण त्यातला एक दिवसाचा टप्पा मात्र बऱ्याच वेळा केला आहे. ऊन-पावसात अनवाणी पायांनी चालणारे, तरीही ओठांवर हरिनाम आणि मनात विठोबाच्या दर्शनाचा ध्यास … Continue reading प्रतिसाद – ऑगस्ट २०२५

प्रतिसाद: फेब्रुवारी  २०२५ 

भानू काळे यांचा श्री. सारडा यांच्यावरील लेख वाचून जुनी आठवण जागली. दिलीपराज प्रकाशनाचे राजीव बर्वे यांनी मला सांगितले, की नाशिकच्या श्री.सारडा यांना तुमच्या ‘पत्रांजली’ कादंबरीच्या अनेक प्रती हव्या होत्या. त्या तेव्हा उपलब्ध नव्हत्या म्हणून दिलीपराजतर्फे दुसरी आवृत्ती काढण्याचे ठरले. इथून पुढे माझा दिलीपराज बर्वे यांच्याशी स्नेह जुळला. त्यांनी माझी बरीच पुस्तके प्रसिद्ध केली; पण याला निमित्त ठरलेले पण मला कधी न भेटलेले हे  थोर व्यक्तिमत्त्व.  … Continue reading प्रतिसाद: फेब्रुवारी  २०२५ 

प्रतिसाद :जानेवारी २०२५ 

तुमचे डिसेंबर २०२४ संपादकीय वाचले. चांगले आहे. त्यात डॉ.जेस्ते यांचा उल्लेख आहे. त्यांनी  पदवी शिक्षण बी. जे. मेडिकल पुणे येथून व पदव्युत्तर मुंबईतील G. S. Medical College येथून घेतले. त्यांची   व्याख्याने मुंबईत झाली होती ती मी आवर्जून ऐकली होती. डॉ.जेस्ते माझे मित्र डॉ.विहंग वाहिया यांच्या  ओळखीचे आहेत. डॉ. जेस्ते यांचे नाव वाचल्यामुळे या स्मृती जागृत झाल्या.   डॉ आनंद जोशी  हैदराबादवरचा लेख(नोव्हेंबर २०२४) उत्तमच. माझं … Continue reading प्रतिसाद :जानेवारी २०२५ 

प्रतिसाद – डिसेंबर २०२४

अंतर्नादच्या मागच्या अंकात जयवंत दळवी यांच्या साहित्यावर एक अभिनव शब्दकोडे छापले होते. त्यात रसिक वाचकांनी दळवी यांच्या अफाट साहित्य कर्तृत्वाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन होते. त्या आवाहनाला माझा प्रतिसाद ! ‘जयवंत दळवींची महानंदा’ कथा,कादंबर्‍या,व्यक्तिचित्रण,नाटक,प्रवासवर्णन,विनोदी लेखन,पत्रकारिता अशा विविध साहित्यिक आघाड्यांवर आपल्या तरलतेचा अमीट ठसा उमटवणारे जयवंत दळवी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष !  जयवंत दळवी व माझा परिचय माझ्या अकरावीतला! त्या वेळी वाचलेली त्यांची ‘चक्र’ व ‘माहिमची … Continue reading प्रतिसाद – डिसेंबर २०२४

प्रतिसाद – ऑक्टोबर २०२४

प्रश्नोपनिषद : ऑक्टोबर २०२४ मंडळी,   आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.   या वेळच्या प्रश्नाची थोडीशी पार्श्वभूमी अशी : सध्या जग दोन युद्धांच्या गर्तेत सापडले आहे.  युक्रेन आणि गाझा येथे जे काही चालले आहे ते आपण हताशपणे पाहण्याशिवाय काही करू शकत नाही. नुकतीच वैशाली करमरकर यांची एक मुलाखत मी  ऐकली. त्या एक आंतरसांस्कृतिक विश्लेषक आहेत. त्यांनी … Continue reading प्रतिसाद – ऑक्टोबर २०२४

प्रतिसाद : ऑक्टोबर २०२४

सप्रेम नमस्कार ‘शितावरून भाताची परीक्षा’ हा लेख वाचण्यात आला. तसे  बघता माझा आणि साहेबाच्या देशाचा संबंध  १९७०पासून जवळजवळ ३० वर्षे होता. मी ज्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत  होतो त्याची एक शाखा  लंडनजवळ होती; त्यामुळे अनेक वेळा जाण्याचा योग आला. आता २५ वर्षे झाली; पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले हे खरे. आता वर्णन केल्याप्रमाणे व मी ज्या ताज्या बातम्या youtube वर बघतो त्याप्रमाणे साहेबाला आता इस्लामचा … Continue reading प्रतिसाद : ऑक्टोबर २०२४

प्रश्नोपनिषद

मंडळी,  या अंकापासून एक नवीन सदर सुरू करत आहोत.  आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.  या वेळचा प्रश्न आहे –  अवैदिक/ अब्राह्मणी संकल्पना आणि आदर्श  हे या देशाचे खरे स्थानिक तत्त्वज्ञान आहे का ?  उत्तरासाठी शब्द मर्यादा  ३०० शब्द.  आमच्या या पहिल्याच प्रश्नाला मार्गदर्शक भानू काळे यांनी दिलेले उत्तर खालील प्रमाणे :  एके काळी केवळ … Continue reading प्रश्नोपनिषद

प्रतिसाद : मे २०२४

रसिकत्वाची साधना हवी.      ‘जयपुर लिटफेस्ट ‘ हा विचार प्रवर्तक लेख आवडला.  या संमेलनाचा जरूर  अभ्यास व्हायला हवा पण त्यापूर्वी मराठी समाजात अभ्यासू वृत्ती निर्माण व्हायला हवी. मराठी भाषेच्या अभिजात स्वरूपाला मान्यता मिळण्यासाठी हरी नरके यांच्यासारखे साहित्यिक, विचारवंत आयुष्यभर झगडत राहिले.  तर दुसरीकडे इंग्रजी माध्यमाकडे मराठी समाज झुकत चाललेला आहे.  माझे इंग्रजी भाषेची अजिबात भांडण नाही.  परंतु या माध्यमात शिकलेल्या उच्चशिक्षित तरुणांना इंग्रजी  भाषेची गोडी लागली … Continue reading प्रतिसाद : मे २०२४