मुखपृष्ठ:  एप्रिल २०२६ :  चैत्रांगण

रांगोळी : सौ. शुभांगी जोशी  चैत्र महिना सुरू झाला आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जाणारा  हा महिना सुरू झाला, की ‘चैत्रांगण’ अपरिहार्यपणे आठवते.   चैत्रांगणाचा उगम  हा लोकसंस्कृतीत  आहे.  विविध शुभचिन्हांनी नटलेली रांगोळी  चैत्र महिन्यात काढली जाते. आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणजे ही रांगोळी असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. ही माझी अत्यंत आवडती रांगोळी. या रांगोळीत  एकूण किती चिन्हे असावीत   याचा काही निश्चित … Continue reading मुखपृष्ठ:  एप्रिल २०२६ :  चैत्रांगण

गाव करी ते राव न करी

हिवतर गाव – एका अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे शुकाचार्यांच्या डोंगरापासून चार किलोमीटरवर  असलेले एक गाव. पावसाळा चालू असल्याने हिरवेगार. रस्त्याच्या दुतर्फा मका, ऊस आणि झेंडूचे मळे.  गावाचा उंबरा १०० ते १२०. प्रत्येक घरात शेळ्या, मेंढ्या, गाई,म्हशी.  फुलांनी भरलेली जास्वंद,  पानागणिक लागलेली सीताफळे  लक्ष वेधून घेत होती.  दारात छोटेखानी मांडव घातला होता. लायगर  नावाचा एक भला मोठा अल्सेशियन  कुत्रा या सर्वांवर नजर ठेवून होता.   घरातला … Continue reading गाव करी ते राव न करी

पंचमी सामाजिक सौहार्दाची 

फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोले पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धराराणी माझे पण प्राणनाथ घरी नाही आले जळ भरे पानोपानी, संतोषली वनराणी खळाखळा वाहतात धुंद नदीनाले पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले आरशात माझी मला पाहू बाई किती वेळा वळचणीची पाल काही भलेबुरे बोले गीतकार : ग दि माडगूळकर, संगीत व स्वर गजानन वाटवे यांचा.            पूर्वी नागपंचमीच्या सुमारास … Continue reading पंचमी सामाजिक सौहार्दाची