संत,पंत,तंत  काव्यविषयक लेखमाला (११) 

कवी विठ्ठल

कविता स्फुरते कशी याचे दोन प्रवाह कविमनाला जाणवतात. मनातल्या भावनांचा उद्रेक होऊन अंतरातून बाहेर आलेली भावगर्भ कविता आणि दुसरी बाहेरच्या परिस्थितीचा मनावर परिणाम होऊन बाहेरून आत आलेली कविता.  संतकाव्य  हे अंतरीच्या उमाळ्यातून  ‘अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी’ या प्रकारातलं. परमेश्वर  हाच संतकाव्यरचनेचा विषय होता त्यामुळे  कविता भक्तिसंकल्पनेभोवतीच फिरत होती. 

कालौघात  विषय बदलत जातात. ते बदलणं गरजेचं असतं.  पंतकवींच्या रचनेत पुराणकथांचं विश्व कथाकाव्य रूपात आलं. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अशा मानवी वृत्तींचा काव्यात परिपोष झाल्यामुळे ते मानवी पातळीवर आलं. काव्यातून ‘फक्त उपदेश’ ही पायरी मागे राहिली. 

ओवीबद्ध रचनेऐवजी विविध वृत्तांच्या वापराने काव्यात गेयता आली.

  काव्यरचनेच्या या नकळत घडत जाणाऱ्या पायऱ्या होत्या… आहेत. वृत्तांचं प्रेम जडल्याने वृत्तांमध्ये बसवण्यासाठी वाटेल तसा ऱ्हस्व दीर्घाचा वापर, शब्दांची विनोदी तोडमोड असेही प्रकार होऊ लागले.  असे होणे हीदेखील  अपरिहार्य गोष्ट होती.  दीड-दोन वर्षांची बाळं एखादा शब्द उच्चारता आला की त्या शब्दात गुंतून त्याचेच आवर्तन करत राहतात; तशीच वृत्ते, अलंकार यांच्यात या वळणावरची कविता गुंतली. या कवितेत रसवत्ता आहे; पण काव्यगुणांचा परिपोष नाही; पण यावर टीका करणेही योग्य नाही. बाळाचं दुडदुडणं, बोबडं बोलणं ही जशी पायरी तशीच ही काव्यरचनेची महत्त्वाची पायरी. 

या पायरीवरचं एक नाव

कवी विठ्ठल. 

अर्थापेक्षाही शब्दांशी, वृत्तांशी  आणि विविध रचनाबंधांशी खेळण्यात रमलेला हा कवी. 

विद्वज्जीवन, पांचालीस्तवन, शुकरंभा संवाद, रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवर यांसारख्या रचनांमधून त्याने नाट्य, रस, वृत्त असा विविधांगी पट विणला आहे. 

या भागात त्यांच्या वृत्तरचनेचा आढावा घेऊ या. 

 कवी म्हणून त्यांची अशी विनम्र भावना होती.  उत्कट रसाळ काव्य रचणारा नसलो तरी 

असे त्यांनी म्हटले आहे आणि त्यानुसार मोठी काव्यरचना केली आहे. त्यांची काव्यविषयक भूमिका काय होती… 

रस, यमक, अनुप्रास, बंध यांची सालंकृत  भक्तिरचना असं काव्याचं रूप त्यांच्या मनात होतं. हे काव्य ‘पूर्वजन्मदुरितद्रुम’ – पूर्वजन्मात घडलेल्या पापाच्या वृक्षाचा नाश करेल अशी त्यांची खातरी होती.  

 त्यांच्या रचनांमधला मजेशीर भाग म्हणजे गूढ संदेश. रुक्मिणीला शिशुपालाशी विवाह करायची इच्छा नसते. ती सुदेवाला भुजंगप्रयातात संदेश देते :

याची उकल कशी :

केशवनामांत २४ वे नाव कृष्णाचे आहे. तोच माझ्या मनाचा विसावा आहे. 

त्यजी बत्तिसावा…  म्हणजे बत्तिसावे संवत्सर – विलंब. विलंबाचा त्याग कर… वेळ घालवू नकोस. चौतिसावे  संवत्सर शार्वरी म्हणजे रात्र. तो पंथ घे म्हणजे रात्रीच्या वेळी गुपचूप निघून श्रीकृष्णाला घेऊन ये. 

साध्यासुध्या भक्तिप्रधान काव्याच्या परिघाबाहेर पडलेली अशी गमतीदार कविता आपल्या मेंदूला खाद्य पुरवते. 

वृत्तातील एक मजेशीर खेळ   हादेखील एक विशेष 

जलोद्धतगती (जसजस)

मराळगमनी मनीषिणींसवे

सवे उपरमे रमे मन जवे

जवे करुनि घे  निघे स्तुति करी

करींद्रगति ये तिये शचि धरी

(रुक्मिणी स्वयंवर  सर्ग ४/१८)

गमनी मनी, उपरमे रमे

करुनि घे निघे असं मध्ययमक  या रचनेत त्यांनी साधले आहे.

पांचालीस्तवनात त्यांनी विविध वृत्तांचे उपयोजन केले आहे. शिखरिणी वृत्तात त्यांनी एक कोडं गुंफलं आहे. ते उकललं की पांचालीस्तवन कधी रचलं त्याचा शक कळतो. 

रसनिधिइषूभू हा कोणता शब्द? त्याची फोड केली की उलगडा होतो. 

रस एकूण : ६  कटू, आम्ल, मधुर, लवण, तिक्त,  कषाय 

निधी ९ : पद्मनिधी, महापद्म निधी,  नीलनिधी,  मुकुंदनिधी, नंदनिधी, मकरनिधी, कच्छपनिधी, शंखनिधी  खर्वनिधी

इषु (बाण) ५ – सर, इषु, सायक, तीर, नाराच

भू १

हे आकडे उलट्या क्रमाने लिहिले की १५९६ ही संख्या मिळते.  या कोलांटउड्या काव्यात आताच्या काळात झेपणाऱ्या नसल्या तरी त्या काळात हे नवीन होतं म्हणून लोकप्रिय होतं. 

पान २५९ पदसंग्रह

मात्रा वृत्तातही या कवीने रचना केल्या आहेत. सूर्यकांत मात्रा वृत्त ८८८३

मदनरंग, दासी, परिलीना अशांसारख्या भृंगावर्तनी मात्रा वृत्तांतील पदेही आढळतात. 

 कबीरकथेत त्यांनी गीति वृत्त उपयोजिले आहे. 

१२-१८-१२-१८

कबिरमुखांतुनि वाणी ऐकुनि संतोषि होय बहु वाणी

गुणहि त्याचे वानी बोले कबिरासि काय तुज वाणी(२४८/१७)

वाणी या शब्दाचे तीन वेगवेगळे अर्थ यात त्यांनी गुंफले आहेत. 

वामनचरितही गीतिवृत्तात आहे. वामनाच्या मौंजीबंधन कार्यावेळी सूर्य त्याला मंत्र शिकवतो आणि बृहस्पती ब्रह्मसूत्र देतो. हे अवघड शब्द गीतिवृत्तात रचताना त्यांनी यमकाचीही जोड दिली आहे. (४/२८)

एक सविता म्हणजे सूर्य आणि दुसरा सविता म्हणजे जन्म देणारा! 

त्याच्या तेजाने  नर्मदातटीचे विप्र चकित झाले,

असा शाब्दिक खेळ त्यांच्या कवितेत सतत चाललेला दिसतो. 

कामदा (र य ज ग) आणि शुद्धकामदा 

(न र र ल ग) ही अतिशय गोड वृत्तं. द्रौपदी वस्त्रहरणात या वृत्तांचा गोडवा दुर्योधनाचा दांभिकपणा रंगवण्यासाठी योजला आहे. (१७६/३)

दुर्योधन गोड वाणीने  सांगतो

हे बोलता बोलता नक्राश्रू पाझरू लागले, उपरती झाली आहे असे नाटक करत दुर्योधन गोड वाणीने म्हणाला

थंड तिरकसपणे यथायोग्य वृत्तातून मानवी स्वभाव त्यांनी दर्शवला आहे. 

चामर १७७ रजरजर

दुर्योधनाच्या नक्राश्रूंमुळे भोळ्या धर्मराजाला आश्चर्य वाटलं

साध्यासुध्या लोकांसाठी केलेली अशी रचना. 

विद्वज्जीवन काव्यात सात सर्ग आणि ३५३ श्लोक आहेत. पौराणिक कथावर्णनच असले; तरी विद्वान लोकांना हे आवडतील असे कवीला वाटत होते म्हणून नाव विद्वज्जीवन असे नाव त्यांनी योजले. 

वानगीदाखल तोटक वृत्तातील एक रचना

कमळ, कमला पंक ( चिखल)मला अशी शाब्दिक कसरत वाचताना मजा येते.    

पंडितांच्या अभिरुचीसाठी लिहिलं असल्याने  यात अनेक अलंकार, वृत्तांनी नटलेली कवितासुंदरी सामोरी येते. 

रुक्मिणी सुदेवाच्या निरोपाची वाट बघत आहे. व्याकूळ झाली आहे. तिची घायकुती अवस्था व्यक्त करण्यासाठी तोटक वृत्त  (समरा*४) जलद ठेक्यामुळे अगदी समर्पक ठरतं. 

पान १५२/३५

हरिणांक- चंद्र, नि-सारखा, आनन – चेहरा= चंद्रानना – खास पंडिती रचना! 

रथोद्धता रनरलग १५९/३४

हरिविना व्याकूळ झालेली राधा म्हणते

ईश्वर एकच आहे. त्याला विष्णू म्हणा कृष्ण म्हणा की राम! अशी शिकवणही विद्वज्जीवनमधून ते देतात. 

आणि म्हणतात, 

अक्षराणाकारोS स्मि मधला चौथा वर्ण (णा) काढून उरेल तो मीच आहे… म्हणजे राम! 

१५५ ३ श्रीकृष्णाचं वर्णन  करण्यासाठी म र भ न य य य  गणांचं २१ अक्षरी वृत्त योजलं आहे. स्रग्धरा ( चालध्यायेदाजानुबाहुं) 

(वक्त्री म्हणजे मुखातून) 

इतक्या मोठ्या वृत्तात  शब्द ओढाताण न होता इतके सुरेख आणि सुरेल बसतात की  पंक्ती गुणगुणायचा मोह होतोच. 

याच वृत्तातील श्रीकृष्ण स्तवनात

कुवलयनयना हा भला मोठा शब्द किती सहज बसला आहे बघा! 

  रुक्मिणीस्वयंवराचं  वर्णन  ते रसिकतेने  करतात. (१२१/४१) 

उपेंद्रवज्रातून देशस्थ पद्धतीचे लग्न समोर उभं करतात.  स्थळविपर्यास करत ‘धेंडा नाचवणे’ सारख्या देशावरील प्रथा रुक्मिणी स्वयंवरातही त्यांनी आणल्या आहेत. 

रसमंजरीमध्ये नायिकाभेद स्पष्ट करताना मानवती नायिकेचं उपेंद्रवज्रातून वर्णन करतात. पती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षिला गेला आहे, पत्नीला हाक मारताना प्रेयसीचं नाव मुखात आलं हे लक्षात आल्यावर रागावूनही ती त्याचा अपराध पोटात घालते. तो क्षमा मागतो आणि साप हातात धरायच्या दिव्याला सामोरं जायला तयार होतो.  २२७/३५

पतीचे परस्त्रीगमन तिला कसे कळले? 

डाग या  शब्दाचा एकाच ठिकाणी उचित उपयोग भुजंगप्रयातातून ते करतात; तो दोन ठिकाणी चपखल बसतो. 

या शब्दचमत्कृती निकृष्ट मानल्या जात असल्या तरी काव्यात गंमत आणतात. 

उपेंद्रवज्रा पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत आणि इंद्रवज्रा दुसर्‍या आणि चौथ्या अशा उपजातिवृत्ताला विपरीतपूर्वा  म्हणतात. रुक्मिणी सुदेवाला श्रीकृष्णाकडे लग्नासाठीचे  विनंतिपत्र देण्यासाठी पाठवते.  त्या वेळी श्रीकृष्णाने प्रेमाने केलेल्या आदरातिथ्याची

 झलक७३/५१

सूर्याच्या बारा कला आणि चंद्राच्या सोळा कला, दाहक उन्हाळा यांची आणि    ‘भवतापा’ची आणि मेघ आणि मेघनीळ यांची सांगड घालत ते म्हणतात(मंदाक्रांता) १५७/१३

१५८ २०/   

हा रमणीस निरोप निरोपी

हारमणी मग हा तिस वोपी 

दोधकातला असा पंडिती शब्द खेळ! ही विठ्ठल कवीची खासियत. 

 कवीने भगवद्गीतेचे सार कटिबंधात गुंफले आहे. कटिबंध ही पादाकुलकातील, १६-१६  मात्रांचे अनेक चरण असलेली  वेगवान रचना. अर्जुनाने शस्त्र खाली ठेवल्यावर श्रीकृष्ण म्हणतो, २०१. 

हा धिक् तुज कौंतेयासि म्हणे कोण समय हरिपुंगव हा, उपहास करिल पहा, शोक महा हा, करिशि अहाहा… 

जिवलग मित्रा| स्पर्शुनि गात्रा| विकसितनेत्रा|

धरि करि तोत्रा| ज्ञानदमुद्रा| दावुनि भद्रा|…

 पुढच्या शब्दांची उत्सुकता वाढत जाते. 

विश्वरूप दर्शन घडवताना अनुस्वारांची मधुर योजनाही कटिबंधाची गेयता वाढवते. २०४

यात अचानक रौद्ररसाची झलक दिसते. 

सीतास्वयंवर ३५/३६

सुकुमार रामाला एवढं मोठं धनुष्य कसं पेलता येईल? ही विवंचना जनकाला पडली आहे.   मालिनी वृत्ताच्या आर्ततेतून ती वाचकांच्या मनाला भिडते. 

परुषावृत्ती अनुप्रासामुळे या काव्यात आगळी मौज येते. 

४१/३५

याच वृत्तातलं रामाचं वर्णन

(चाचर म्हणजे जटा, षट्पद म्हणजे भुंगा – भुंग्यासारखा निळसर रंगाचा) 

 रुक्मिणीचं याच वृत्तातलं गहिरं वर्णन. श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आतुर चांचर चालीने – अडखळत निघालेली रुक्मिणी 

८४ /२२

  कथाकाव्यात नाट्य निर्माण व्हावं  म्हणून कवी सूचक स्वप्नांचा आधार घेतो. वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदीला पडलेलं स्वप्न अर्जुन धर्माच्या कानावर घालतो. तेव्हा धर्म स्त्रियांच्या विरोधात बोलताना दाखवला आहे.  कवी विठ्ठलाच्या काळात स्त्रियांना स्वातंत्र्य नसल्याने त्यांनी कालविपर्यास करत धर्माच्या तोंडी त्याच्या काळातील वाक्यं घातली आहेत. तो म्हणतो, ‘जो स्त्रीचं मत ऐकतो त्याला दुःखच होतं, अंगनामते सर्व नाडिले – पुढे प्रमाणिकेसारखा जोरकस छंद वापरून स्त्रियांविषयीचं त्याचं मत सडेतोडपणे मांडलं आहे. 

प्रमाणिका छंद १८०- ३८,३९,४०

हे नाट्य अधिकाधिक गडद होत जातं. 

द्रौपदीला सभेत आणल्याने भीष्म, कृपाचार्य आणि द्रोणाचार्यांनी दुर्योधनाला ‘बंधुअंगना माउलीपरी, भूपति बरी बुद्धि हे धरीं’’ असे सांगतात. यावर खवळलेल्या दुर्योधनाचा संताप व्यक्त करताना पंचचामर वृत्ताचं १८८ चपखल उपयोजन केलं आहे.  तो या श्रेष्ठांना म्हणतो… (जरा= म्हातारपण) 

७ मात्रांचे गण असलेल्या विबुधप्रियेतील (रसजजभर)  रचना. द्रौपदी आर्ततेने श्रीकृष्णाचा धावा करत असते. १९३/१६५

श्रीकृष्णाची नावं ७/७  मात्रांमध्ये गुंफून सुरेल भक्तिशब्दमाला श्रीकृष्णाला चढवली आहे. 

इंद्रवंशा १४८ ६ ततजर आणि वंशस्थ यांची गुंफण घालून 

दास्यभक्तीसाठी परिचारिका भक्ती हा शब्द योजून वृत्तरचना साधली आहे. शब्दांची अशी निवड अचंबित करते. 

स्वर्गंगा वृत्त – याची चाल फटक्याची नाहीतर श्रावणमासी. 

८-८-८-६ १६०/३

वृत्तांच्या मांदियाळीत विद्युन्माला हे विजेसारखं चपळ, वृत्तही डोकावून जातं. 

पान १५० १९ 

चार वेळा राधिका गण असलेले स्रग्विणी (पद्मिनी)  वृत्तही चपळ गतीमुळे चैतन्य निर्माण करतं

७२/३७,४३

रुक्मिणी स्वयंवर प्रसंगी उपासकांची उपासना आणि  नगरीच्या शोभेचे वर्णन पृथ्वी वृत्तात गुंफले आहे. (चाल : अनन्यगतिका जना) 

 ट, ठ, ड च्या योजनेमुळे उपासकांची कठोर उपासना दृग्गोचर होते :

तर अनुस्वारांच्या उपयोजनेमुळे नागरिकांचा आनंदोत्साह अनुभवता येतो. 

८८/५

देवदर्शनाला रुक्मिणी निघाली असताना, पुढे काय? आता श्रीकृष्ण कधी? कसा येईल? ही उत्सुकता ताणून धरण्यासाठी  शालिनी वृत्तात सभोवतालचं वर्णन करत राहतात. 

 ८४/२२

कुसुमविचित्रा (नयनय) असे वेगळे वृत्त वापरले आहे. याचीही रचना सैल आहे.   १५३ ३९, ४०

समरा समरा समरा लग अशी लगावली असलेलं अतिशायिनी किंवा उपचित्र वृत्त

मत्ता नावाचा एक सुरेल छंदही विठ्ठलाच्या पोतडीतून निघतो. मभसग १६१/५

विठ्ठल कवीच्या  छंदोबद्ध रचनेत अफाट वैविध्य आहे.  पठडीतल्या नसलेल्या काही वृत्तांची नावंही त्याने रचनेत गुंफली आहेत. त्यामुळे गेयतेला ज्ञानाचीही जोड मिळाली आहे. 

तामरस नजजय १४४ /९ 

चंपकमाळा (भमसग) 

९१/२८ रुक्मिणी स्वयंवर

 चार जगण आले की मौक्तिकदाम वृत्त होतं असं विठ्ठल सांगतात. अशोकवनातल्या झाडांचं वर्णन… 

(२६ अक्षरी छंद) 

 पुष्पिताग्रा वृत्त असं त्यांनी लिहिलं आहे त्या प्रमाणे पुष्पिताग्राच्या पहिल्या ओळीत (विषम चरण)  नजजरग असे गण असायला हवेत. पण पहिल्या ओळीचे गणसजजरग आणि दुसर्‍या ओळीत नसजरग असे गण आहेत. शिवाय अक्षरसंख्याही भिन्न नाही. त्यामुळे हे अर्धसमवृत का म्हणावे हा प्रश्न पडतो. 

त्रिभंगी देहुड्याचं म्हणजेच श्रीकृष्णाचं वर्णन करताना विठ्ठल कवीने वेगवेगळ्या वृत्तांमधून  केलं आहे.

 त्रिभंगी छंदातील असंच एक वर्णन. श्रीकृष्ण जसा तीन ठिकाणी वक्रावस्थेत असतो तसा हा तीन ठिकाणी यती असलेला ३२ मात्रांचा छंद. १५६/१२

‘त्या अमृतधारा’ वृत्तात बसवण्यासाठी अवग्रह वापरणे चुकीचे असले तरी नव्या वृत्ताची ओळख होणं महत्त्वाचं आहे. 

प्रहर्षिणी १६७, ६ मनजरग

काव्यातच या वेगळ्या छंदांची नावं गुंफल्याने काव्याभ्यासाला मोलाची मदत झाली आहे. 

मंजुभाषिणी/कलहंस/सिंहनाद/कुटजा पान१७१-३१ सजससग असतो पण विठ्ठल सजसजग असा घेतात. 

९२/३० रुक्मिणीच्या दागिन्यांचे वर्णन

(राखडी म्हणजे केसांतला दागिना) 

प्रहरणकलिका१७१- ३२ ननभनलग

वामनचरित, शुकरंभासंवाद, सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, विद्वज्जीवन, द्रौपदी वस्त्रहरण, भगवद्गीता, बिल्हण चरित्र, रसमंजरी, पांचालीस्तवन, कबीरकथा, पदे अशी प्रचंड ग्रंथ आणि श्लोकसंख्या असलेल्या विठ्ठलाच्या वृत्त कौशल्याचा हा पट.  मांडणीत कितीतरी उणिवा असतील, कित्येक महत्त्वाची स्थळं शब्द मर्यादेमुळे गाळावी लागली आहेत. म्हणूनच

विठ्ठलाच्या नावात  बदल करून म्हणावंसं वाटतं… 

जे स्पष्ट करू शकले नाही असा दोष पोटात घ्यावा. 

सुषमा जोशी

Author

Leave a Reply