ग्रंथयात्रा हा निवडक मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक अभिनव प्रयत्न आहे. शंभर भागांच्या यू ट्यूब मालिकेद्वारे अर्चना मिरजकर यांनी वेगवेगळ्या मराठी साहित्य प्रकारांचा रसास्वाद वाचकांसाठी घेतला आहे. यांतील काही निवडक भाग अंतर्नाद वाचकांसाठी…
मोलमजुरी करून शहरात जगणार्या लोकांचे अनुभव अत्यंत पारदर्शकपणे नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेतून मांडले. सामान्य माणसाच्या कार्यशक्तीवर, शोषितांच्या संघटित शक्तीवर त्यांचा विश्वास आहे. नारायण सुर्वे यांच्या कवितेपासून साम्यवादी कवितेची नवी परंपरा सुरू झाली, त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये पहा या व्हिडिओमध्ये. प्राध्यापक विवेक खरे यांच्याकडून ऐका सुर्वे यांच्या कवितेचे साम्यवादी पैलू.
