मंडळी,
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू. त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा.
या वेळच्या प्रश्नाची थोडीशी पार्श्वभूमी अशी :
‘समाजस्वास्थ्य’कार रघुनाथराव धोंडोपंत उर्फ र. धों. उर्फ अप्पासाहेब कर्वे हे महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे ज्येष्ठ चिरंजीव. भारतातील ‘संतती नियमन’ चळवळीचे उद्गाते हे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे एक ठळक वैशिष्ट्य. आपल्या मासिकातून त्यांनी एक हाती या विषयाचा प्रचार व प्रसार केला. त्यासाठी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. त्यांच्या लिखाणावर कोर्टबाजी होऊन त्यांना शिक्षाही झाली.
त्यांच्या लिखाणामागे, ‘अश्लीलता वस्तुनिष्ठ नसते, व्यक्तिनिष्ठ असते,’ हे मूलभूत तत्त्व होते.
तर मंडळी या तत्त्वाबद्दल आपली मते काय आहेत ते कळवा. शब्दमर्यादा ३०० शब्द.
रघुनाथराव धोंडोपंत उर्फ र. धों. उर्फ अप्पासाहेब कर्वे
आपली उत्तरे/प्रतिसाद सदराच्या खाली कॉमेंट स्वरूपात देऊ शकता किंवा ई-मेल द्वारा jaysss12@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता.
आपले मत आपण 9422647283 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारादेखील पाठवू शकता.
आणि हो,
या सदरासाठी आपल्याला पडलेले अशा प्रकारचे प्रश्नदेखील आपण पाठवू शकता.
संपादक
